Wednesday, October 30, 2013

सरदार पटेल : नरहर कुरुंदकर यांच्या दृष्टीतून


पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह आणि पंतप्रधान-पदोत्सुक नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून सरदार पटेल यांचे नेमके व्यक्तित्व काय होते? ते हिंदुत्व वादी होते का? त्यांचे आणि गांधीजींचे मतभेद होते का या प्रश्नावर देशभरात चर्चा होत आहे. कै. नरहर कुरुंदकर यांनी “सोबत”च्या १९७५ च्या दिवाळी अंकात “सरदार पटेल: काही समाज व गैरसमज” या नावाने हा लेख लिहिला होता. तो “आकलन” या पुस्तकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे (प्रकाशक: देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा.लि.). आज सर्वत्र मतांचा गलबला दिसत आहे. हिंदुत्ववादी सरदारांना हिदुत्ववादी ठरवण्यासाठी पेटून उठेलेले आहेत... या सर्व पार्श्वभूमीवर कुरुंदकरांसारख्या विचारवंताचे मत तरुणांसमोर येणे अत्त्यावश्यक असल्याने मी हा ब्लॉग लिहीत आहे. 

नेहरूंनी सरदार पटेल यांना पाण्यात पहिले आणि पंतप्रधान होऊ दिले नाही असा एक अतिशय प्रसिद्ध सिद्धांत काही लोक नेहमी हिरीरीने सांगत असतात. सरदार पटेल स्वत: कोणी कच्च्या गुरुचे चेले नसून नेहरू यांच्यासारखेच उच्च विद्याविभूषित बॅरिस्टर आहेत ! नेहरू आणि सरदार यांच्यातील सत्ता समतोल बघितला तरी नेहरू यांनी पटेलांना डावलले हा सिद्धांत खोटा ठरतो. त्या बद्दल कुरुंदकर या लेखात लिहितात:
...... “नेहरू वाटतात तितके डावे नव्हते, ते मध्यकेंद्राच्या डावीकडे होते. सरदार वाटतात तितके उजवे नव्हते. ते मध्य केंद्राच्या उजवीकडे होते”
“महाराष्ट्रात सरदारांची खास माणसे म्हणून जी ओळखली जात त्यात मुंबईचे स.का. पाटील होते. सरदारांच्या मृत्युनंतर ते खासदारही झाले, मंत्रीही झाले. त्यांची शक्ती वाढलीच. मोरारजी देसाई सरदार गटाचे होते. त्यांचीही प्रतिष्ठा वाढतच गेली. सरदारांच्या मृत्युनंतर सरदार गटाचे राजगोपालाचारी गृहमंत्री झाले. सरदार गटाचेच राजेंद्रप्रसाद दीर्घकाळ राष्ट्रपती होते. गोविंद वल्लभ पंत हे स्वातंत्र्यपूर्व काळात कधीच नेहरू गटाचे प्रवक्ते नव्हते. रविशंकर शुक्ला यांचाही नेहरू गट नव्हता. ही यादी वाटेल तितकी वाढविता येण्याजोगी आहे. नेहरूंच्या कारर्कीर्दीत नेहरूवादी मानल्या गेलेल्या काही लोकांचाही अस्त झाला. स्वामी रामानंद तीर्थ हे याचे उदाहरण आहे. तसा काही सरदार पटेल गटातील लोकांचाही अस्त झाला. राजकारणात असे चढ-उतार होतच असतात. त्यांचा गटाशी संबंध नसतो. त्याची कारणे इतर असतात. पुढे चालून भारताचे पंतप्रधान झालेले लाल बहादूर शास्त्री सरदारांच्या मृत्यूपर्यंत नेहरू गटात नव्हते.”

गांधीजींनी नेहरूंना पंतप्रधान करण्यासाठी सरदारांना डावलले का? डावलले असेल तर त्यामागे काय विचार होता? याची समीक्षा करतांना कुरुंदकर म्हणतात की स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान हिंदी भाषिक त्यातही सगळ्यात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचाच असावा हा कॉंग्रेस रणनीतीचा एक भाग समजला पाहिजे. सुभाष बाबू किंवा सरदार पटेल हे भाषिक-दृष्ट्या अल्पसंख्य राज्याचे प्रतिनिधी आणि नेहरू उत्तर प्रदेशचे म्हणून नेहरूंना प्राधान्य दिले गेले असा हा तर्क आहे. या विषयी गांधी-सरदार-नेहरू यांच्यात मतभेद होते का यावर मत देतांना कुरुंदकर म्हणतात-
.....”सरदारांना या वास्तुवादाचे भान होते. जवाहरलाल नेहरू जेनेतेचे लोकप्रिय नेते होते, तरुणांचे नेते होते, अल्पसंख्यांक समाजाचे विश्वासपात्र होते आणि उत्तर भारतीय होते. तेच पंतप्रधान होणार ही गोष्ट स्वाभाविकही आहे व भारतीय अखंडतेसाठी नवजात स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आवश्यकही याची सरदारांना नेहमीच जाणीव होती. “I am there where Bapu put me and I shall remain there as long as Bapu wants so” असे सरदारांनी आपल्या स्थानाचे जाहीर सभेत स्पष्टीकरण केले आहे. या वाक्याचा गर्भित अर्थ असा की नेतेपदी यायचे नाहीनही, संघटनेची सूत्रेच फक्त हाती ठेवायची असा आमचा उभयतांचा एकमताने निर्णय आहे. म्हणून मी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करणार नाही आणि संघटनेची सूत्रेही सोडणार नाही. सरदारांनी श्रेय मात्र नेहमीप्रमाणे बापूंना दिले आहे. गांधीजींचे प्रेम सरदारांवर कमी नव्हते, नेहरूंवर जास्त नव्हते, पण सर्वांच्यापेक्षा भारताच्या भवितव्यावर गांधींचे प्रेम अधिक होते असा याचा अर्थ आहे.”

नेहरू की सरदार असा पेच गांधीजींच्या समोर होता का? तसा तो होता असे दिसत नाही कारण १९४५ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर सरदार मरणोन्मुख अवस्थेत होते. त्यावेळी सरदारांचे वय ७० वर्षे होते (जन्म १८७५) आणि त्या वयात ६० नंतर लोकांनी निवृत्त झाले पाहिजे असा सरदारांचा स्वत:च असलेला आग्रह, अनेक वर्षांपूर्वीच पत्नीच्या मृत्यूने उध्वस्त झालेली कौटुंबिक आस्था, बिघडलेली शारीरिक अवस्था यामुळे स्वत: सरदार पटेल या पदासाठी आग्रही नव्हते. कुरुंदकर लिहितात “ अशाही अवस्थेत अत्यंत कणखरपणे ते वागत गेले हा धैर्याचा भाग आहे. सत्तेचा मोह असण्यासाठी आता जीवनाची शाश्वतीच नव्हती. ४ मार्च १९४८ ला(म्हणजे स्वातंत्र्यानंतर केवळ ७ महिन्यात) त्यांना इतका जोराचा हृदयविकाराचा झटका आला की ते जवळजवळ गेलेच होते. डॉक्टरांनी सर्व आशा सोडून दिली होती तरी त्यातून ते वाचले. त्यानंतर तर त्यांनी सर्वांना सांगितले की ‘आता आजारी असल्याची बातमी येईल अशी आशा करू नका, आता कोणत्याही क्षणी बातमी मृत्यूचीच येईल. मी सुद्धा सकाळी काम करताना संध्याकाळी आपण ते पूर्ण करू ही आशाच सोडलेली आहे. कारण दरक्षणी आम्ही मृत्यूच्या दारात उभे आहोत. जाणत्या वाचकांना हे कळावे की हा झटका गांधीवधानंतर सव्वा महिन्याच्या आत आला आहे तेव्हा क्षोभाचा उगम कुठे असला पाहिजे. हे ही लक्षात घ्यावे की यानंतर सरदार सुमारे २१ महिने जिवंत होते. हा तो काळ नव्हे ज्यावेळी माणूस असलेला नेता बदलून सूत्रे स्वत:च्या हातात घेण्याचा प्रयत्न करील”  सरदारांचेच एक वाक्य कुरुंदकर उधृत करतात ते म्हणजे ‘इच्छा बाळगण्यासाठी माणूस तरुण आणि निकोप असावा लागतो, आम्ही तसे नाही’.... म्हणजेच गांधीजींना नेहरू की सरदार अशी द्विधा निर्माण होण्याची स्थितीच नव्हती ही गोष्ट लोक लक्षातच घेत नसावेत !

सरदार पटेल हिंदुत्ववादी होते का? या मुद्द्यावर कुरुंदकर लिहितात:
“हिंदू मुस्लीम प्रश्नाबाबत सरदारांचे नाव घेऊन लोक फार गोष्टी बोलतात. सरदार कधी हिंदुत्ववादी नव्हते. अखंड भारत टिकवण्यासाठी मुसलमानांना विभक्त मतदारसंघ, विशेष आश्वासन, विशेष अधिकार, राखीव जागा इत्यादी सर्व देण्यास ते तयार होते. वायव्य सरहद प्रांतात सरहद गांधी (खान अब्दुल गफ्फार खान) यांनी नेते असावे, काश्मिरात शेख अब्दुल्लानी पंतप्रधान व्हावे याला त्यांचा विरोध नव्हता. सर्व मुसलमानांना पाकिस्तान मिळाल्यानंतर सुद्धा बरोबरीचे अधिकार असावेत यावर त्यांनी कधी खळखळ केली नाही, पण इतके सगळे झाल्यानंतर मुसलमानांनी या राष्ट्रावर प्रेम करावे हा त्यांचा आग्रह होता. ते सावरकरांचे अनुयायी किंवा गोळवलकर गुरुजींचे अनुयायी जाहीरपणे तर नव्हतेच पण मनातूनही कधी नव्हते. गांधी नेहरूंची भूमिका मुस्लीमधार्जिणी आहे असा त्यांचा आरोप नव्हता.”

सरदार पटेल यांचे चालले असते तर फाळणी झाली नसती असा एक बावळट युक्तिवाद सरदारांना हिंदुत्ववादी ठरवू पाहणारे हौशी लोक करतात त्यावर कुरुंदकरांनी मांडलेली वस्तुस्थिती अशी आहे “सरदारांनी फाळणीची कल्पना प्रथम मान्य केली असा मौलाना आझादांचा आरोप आहे. फाळणीची कल्पना मूळ माउंटबॅटन यांची. टी प्रथम पटली सरदारांना, नंतर नेहरूंना. शेवटी गांधींना. आपण मात्र शेवट पर्यंत अखंड भारतवादी राहिलो असा दावा मौलानांनी केला केला. दावा खरा आहे. मौलाना अखंड भारतवादी होते, त्यासाठी कोणतीही किंमत देण्यास तयार होते. ३५ कोटी हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त करून अखंड भारत टिकविण्या इतके स्वप्नांचे प्रेम गांधी-नेहरू-पटेलांना नव्हते. किंमत मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागताच हे तिघेही तुकडे पडण्यास तयार झाले, ही गोष्ट खरी आहे.”
जे हिंदुत्ववादी (?) भावविवश होऊन फाळणीचा विचार करतात आणि आजच्या काळात देखील अखंड भारत वगैरे अशक्य स्वप्ने पाहतात त्यांनी ही समीक्षा आवर्जून वाचलीच पाहिजे.

गांधी आणि सरदार यांचे वैयक्तिक संबंध कसे होते? यावर कुरुंदकर लिहितात- “कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांपैकी ज्यांनी गांधींची व्यक्तिगत सेवा केली, अगदी त्यांचे कपडे धुणे, अंथरून टाकणे असे परीचर्येचे काम केले, असे सरदार एकटेच आहेत. आणि ज्यांची व्यक्तिगत सेवा गांधीना करावी लागली असेही कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सरदारच आहेत.”......”गांधींनी म्हटले आहे : ‘मला सरदारांना काही विचारावेच लागत नाही. माझ्या मनात सरदारांची प्रतिमा आहे, तिला मी विचारतो आणि बहुधा माझ्या मनातील प्रतीमेने जे उत्तर दिले असते ते शरीरधारी माणूसही देतो’ इतके सरदारांचे मत गांधींना परिचित होते. सरदारांची भाषा कधीच हिंसक कधीच नव्हती, गांधी त्यांना ‘अहिंसेचा हिंस्त्र प्रचारक’ असे म्हणत”

मोदींची काही चूक नाही ! ते बिचारे मोदी-अडवानी संबंधाप्रमाणेच सरदार-गांधी संबंध असावेत अशा समजात आहेत, कारण ते स्वत:ला सरदार समजतात! त्यांच्या बुद्धीची ती मर्यादा आहे! काहीच्या काही ‘फेकले’ की मतांचे राजकारण साधता येईल मात्र तरुणांपर्यंत विकृत इतिहास जाता कामा नये. सोशल मीडिया वापरणार्या तरुणांनी कुरुंदकरांचे हे पुस्तक वाचलेच पाहिजे म्हणजे सर्वच राष्ट्रपुरुषांना आपले विकृत राजकारणी कसे चुकीच्या मार्गाने वापरतात हे त्यांच्या लक्षात येईल.
***

      

Thursday, October 10, 2013

अजित गुलाबचंद द्वारा नरेंद्र मोदी की सराहना "खास" नही, "आम" बात है !

आज जब लवासा के मालिक एवं शरद पवार के करीबी अजित गुलाबचंद ने नरेंद्र मोदी की सराहना की तो कई लोगोंको आश्चर्य हुवा, दरअसल इसमें आश्चर्य की कोई बात नही है I 

गत वर्ष नरेंद्र मोदी अपने एक बिझिनेसमेन साथी को लेकर बिना किसीको खबर किये लवासा आये थे और लवासा कंपनीने उनका स्वागत किया था....जहां तक मेरी जानकारी है, भाजपा की महाराष्ट् इकाई (जो लवासा के खिलाफ लड रही थी) तक को इस बात का पता नही था की मोदी लवासा आ रहे है I यह वो वक्त था जब हमारे साथी छोटे किसान बद्याभाऊ, ठुमाबाई, लीलाबाई, ज्ञानेश्वर शेडगे जैसे कई आदिवासी एवं छोटे किसान लवासा के खिलाफ अपनी करो या मरो लडाई लड रहें थे, आज भी उसी हिंमतसे लड रहे है I

मोदी के लवासा मे आने की सूचना मुझे पत्रकार मित्रोसे मिली तो मैने तुरंत आरएसएस के प्रवक्ता राम माधवजीको एक एसेमेस भेजा जिसमे यह कहा था:

" स्व. नानाजी देशमुख जैसे नेता विनोबाजी के साथ भूदान मे जुटे हुये थे, 'भूदान' जो बडे किसानोकी जमीने छोटे किसानोको देनेका एक कल्याणकारी मॉडल था, लवासा इसके पूर्णत: विपरीत एक ऐसा मॉडल है जिसमे छोटे किसानोकी जमीन एक कॉर्पोरेट कंपनी छीन रही है, क्या यह आरएसएस और भाजपा की नई अर्थनीती है? क्या भाजपा नानाजी, दत्तोपंत ठेंगडीजी को पुरी तरहसे भूल चुकी है? क्या यही 'वनवासी कल्याण' है?"

इसपर मुझे कोई जवाब नही मिला I

नरेंद्र मोदी उस रात लवासा के मेहमान के नाते लवासा के एक होटल मे रुके थे I इस बीच मराठी न्यूज चैनल्स द्वारा इस मुद्दे को उठाये जानेपर नरेंद्र मोदी को अजित गुलाबचंद के साथ प्रस्तावित अपनी प्रेस कॉन्फरन्स को रद्द करना पडा !

इसके कुछ दिनों बाद और एक नये हिल स्टेशन का प्रस्ताव महाराष्ट्र शासन को प्राप्त हुवां जो शायद मोदिजी के मित्र का ही है !

विकास की आजकी परिभाषा है छोटो को कुचल कर बडों की संपत्ती मे वृद्धी करना I इसके लिये राजनेता और पुंजीपती इनमे आपस मे मित्रता होनी जरुरी है ! इसीलिये जब अजित गुलाबचंद ने आज नरेंद्र मोदी को "market friendly" कहा तो समझने वाले समझ गये ! दरअसल इसलिये की देश का संविधान आजभी समाजवाद की नीव को नकारता नहीं, हमारे राजनेता सीधे नही कह सकते की वो पून्जीपती का साथ देते है, ना ही पुंजीपती सीधे कह सकते है की राजनेता उनके मित्र है, अत: मार्केट फ्रेंडली जैसे शब्द अनिवार्य बनते है......

वरना कोई बताये की भाजपा और कॉंग्रेस की अर्थनीती मे क्या अंतर है? उत्तर बस वही है! कॉंग्रेस का राज किसी एक अंबानी का राज है तो भाजपा का राज किसी एक अदानी का राज होगा...! मतदाता तो आखिर एक दिन का मालिक है, हमारे असली मालिक शायद कोई और है....हम सत्ता परिवर्तन नही करते, बस स्वामी परिवर्तन करते है! बस....